Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Thursday 25 May 2017

दर्द


#दर्द
#यादपियाकीआए

दर्द..

'अम्मी..मै खेलने जाऊ..?!'
'साया…और तालीम कौन लेगा..?'
'अम्मी..अभी मुझे खेलने जाना है, मुमताज राह देख रही होगी..'
'फिर वापीस घर मत आना…'
साया रागातच घरात निघून गेली...
अम्मी पुन्हा स्वयंपाकात मग्न झाली..
थोड्या वेळाने दार वाजलं, अम्मीने सायाला दार उघडायला सांगितलं..
'अम्मीss सलीम चाचा और रियाझ आए है!'
अम्मी बाहेर आली..
'अरे चाचा, आओ ना..समान लगवाओ तबतक हम आते है'
'जी..'
सामान लावलं जातं, ताबला-डग्गा घेऊन चाचा बसतात..रियाझ शेजारी बसतो, साया तानपुरा काढून समोर बसते..तेवढ्यात अम्मी येते.. तानपुरा लावते आणि तो सायाकडे देते..
गाणं सुरू होतं..

याद पिया की आये..
यह दुःख सहा ना जाये- हाये राम..

बाली उमरिया सूनी री सजरिया..
जोबन बीता जाये- हाये राम..

बैरी कोयलिया कूक  सुनावे…
मुझ बिरहन का जियरा जलावे..
हाँ पी बिन रहा ना जाये.. हाये राम
याद पिया की आए…

मधे-मधे चाचा दाद देत असतात..आणि गाणं संपतं..
'आज तो कमाल कर दिया बेगम साहिबा…'
'बस, अल्लाह मेहरबान है भाईजान, पर सिर्फ आवाज पे..तकदीर तो खुदा ने ऐसी लिखी की ये दर्द अपने आप गानेमे उतरता है..'
अम्मीचा कंठ दाटून आला..चाचाने घाई घाईने मुलांना खेळायला जायला सांगितलं, सायाला तर कोण आनंद झाला..रियाझचा हात पकडून त्याला ती धावतच घेऊन गेली..

आणि ते गेल्यावर अम्मीने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली..
चाचा तिला समजावत होते..शांत करत होते..शेवटी सायाकडे बघून सावरायला हवं असं सांगून त्यांनी अम्मीला शांत केलं..
आणि रात्रीच्या मैफिलीची चर्चा करुन निघाले..
खाली रियाझ आणि साया आणखी दोघांबरोबर खेळत होते..
चाचाने रियाझला हाक मारली..तो लगेच यायला निघाला पण सायाने त्याचा हात पकडला आणि चाचांना आणखी थोडा वेळ खेळुदे असं सांगू लागली..चाचाने सुद्धा रियाझला थोडाच वेळ, असं सांगून लवकर घरी यायला सांगितलं..दोघे पुन्हा खेळात मग्न झाले..

चाचाचं घराणं हे अम्मीच्या घराण्याला पिढ्यानपिढ्या साथ करत होते, चाचा ही तिसरी पिढी..आणि आता रियाझ सुद्धा मन लावून चाचांकडे शिकत होता.. सायापेक्षा ५ वर्षांनी मोठा होता..तरी दोघांची अगदी लहानपणापासून खूप छान गट्टी होती..

रात्री मैफिलीची तयारी सुरु होती, अम्मी, तिची बहीण, साया, चाचा आणि रियाझ असे सगळे पोहोचले..जुजबी बोलणं, चहा वगैरे होऊन अम्मी गायला बसली..
मैफिल रंगत होती..सायाला मधेच स्वर लावायला सांगितल्यावर तिच्या आवाजालाही दाद मिळत होती..आणि शेवटी अम्मीने 'याद पिया की आए' गायला घेतली...आणि ती खूप रंगली, अगदी लोकांचे डोळे पाणावले इतकी रंगली..

अम्मी, तिची बहीण आणि सायाला त्यांच्या घरी सोडून चाचा आणि रियाझ घरी गेले..
घरी आल्यावर राहिला मौसिनेही अम्मीचं कौतुक केलं..आणि सायाला तर बटव्यातून शगुन काढून दिला..साया खूप खूष झाली आणि झोपायला गेली..
त्या दिवसानंतर साया अम्मीकडे मन लावून शिकू लागली..रियाझ तिला साथ करु लागला..काही वर्ष गेली..दोघेही आता मोठे झाले होते..
रियाझचं शिक्षणही पूर्ण होत आलं होतं..आणि तबला वादनातही उत्तम प्रगती केली होती त्याने, आणि अशातच सायाची पहिली स्वतंत्र मैफिल करायचा योग आला..आणि अम्मीने रियाझने सायाला साथ करावी असा आग्रह धरला! झालं, ठरलं..सायाची मैफिल आणि रियाझची साथ..
आदल्या दिवशी तालीम झाली..अम्मीने सायाला काय काय गायचं ते सांगितलं, रियाझच्या साथीने ते गाऊन घेतलं..

दुसऱ्या दिवशी सगळे अगदी उत्सुकतेत होते, सायाचा उत्साह तर ओसंडून वहात होता!
आता कार्यक्रम सुरू व्हायला अगदी काही मिनिटं राहिली होती..
साया येऊन बसली, तानपुरा आधीच मिळवून ठेवलेला, तो घेतला..
उजवीकडे रियाझ साथीला बसला..
आणि सायाने डोळे बंद केले..
तिला आठवत होती अम्मीची तीच मैफिल..
शेवटी गायलेलं याद पिया की…
मागे तानपुरा वाजवताना टिपलेले प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव..
काहींचे पाणावलेले डोळे...
गाणं संपल्यावर काही क्षण दाद म्हणूनच आलेली पूर्ण स्तब्धता..
आणि मग 'क्या बात है, सुभान अल्लाह, लाजवाब.. जिती रहोचे घुमलेले आवाज..
तिने मनोमन ठरवलं होतं..आज तेच सगळं ती पुन्हा उभं करणार होती.. अम्मीचं नाव रोशन करणार होती..
आणि या निग्रहानेच तिने डोळे उघडले..
स्वर लावला आणि गायला सुरवात केली..
दाद चांगलीच मिळत होती, तिचा पहिला कार्यक्रम, तसं लहान
वय आणि अम्मीची मुलगी म्हणून दाद जास्ती होती..
आवाज उत्तम होता, फिरत सुंदर होती, रागज्ञान उत्तम होतं..

आणि हळूहळू मैफिल शेवटाकडे आली..
अम्मीने तिला भैरवीतली एक बंदिश म्हणून शेवट करायला सांगितला होता..पण आयत्या वेळी सायाने 'याद पिया की आए' गाऊन शेवट करते असं जाहीर केलं..अम्मीची नाराजगी तिला दिसत होती, तिने नको अशी केलेली खुणही तिला तिरक्या नजरेने दिसली, पण तिने डोळे बंद केले आणि गायला लागली..

याद पिया की आए…

अधून मधून ती लोकांचे भाव टिपत होती..पण तिची निराशा होत होती..सगळे शांतपणे ऐकत असले, तरी त्या त्यादिवशीचे ते भाव एकाही माणसाच्या चेहऱ्यावर नव्हते..
तिने गाणं संपवलं..टाळ्याही पडल्या..
लोकांनी अम्मीकडे कौतुक केलं, तिला येऊन सांगितलं..
सगळे घरी आल्यावर चाचा म्हणाले, 'बोहोत खूब गाया बेटा, पर तुम्हारे उमर के हिसाब से गाया करो, सूर सही है, बस दर्द आना बाकी है!'
अम्मी चिडली होती..पण काहीच बोलत नव्हती..
म्हणून चाचाने दोघांना दर्ग्याला जाऊन यायला सांगितलं आणि दोघे गेले..

इकडे अम्मीने चचांना रूह अफझा दिलं..आणि दोघे गप्पा मारू लागले..अम्मी म्हणाली
'इसकी मनमानी ना करती तो कितना अच्छा होता..!'
'बच्ची है, समझ आनेमे थोडा वक्त लगेगा..खैर एक बात बतानी थी..रियाझ विलायत जा रहा है..सिखना चाहता है, मैनेभी मना नही किया..'
'ये तो बडी अच्छी बात है..बडा काबिल बनेगा रियाझ..हाए..और एक हमारी लडकी..!'
'जी ये बात तो नामंजूर है..साया बेटी बडी प्यारी है..जिसके नसीब होगी, उसका साया बन के रहेगी..नाम ही ऐसा रखा है!'
'ये सब आपके भाईजान की देन है..ये नई झिंदगी मुझे सोपकर खुद चल बसे अकेले…'
'अब मु कडवा मत करो..खुशी का दिन है, बच्चे आतेही होंगे..'

इकडे दर्ग्याला दर्शन करुन दोघे बाहेरच्या आवारात बसले..
'इतनिभी आझादी नही ले सकते..मै बेटी हू या कटपुतली..?'
'साया..जबान संभालो..'
'इतनाभी क्या गलत किया मैने..? बताओ..?'
'सयानी हो..अब्बाने कहा ना..दर्द आना बाकी है..'
'सयानी..? मोहोब्बत करते है तुमसे..'
'साया..? होश मे हो..?'
'बेशक..वही बताना था..'
'ये अभि मुमकीन नाही है..'
'क्यू..? अभि नही तो कब..?'
'कहा ना सयानी हो अभि..'
'नही..जवाब दो..अभि नही तो कब..?'
'अच्छा..? तो सुनो..जब दर्द आएगा तब..'
इतकं बोलून रियाझ त्याच्या घरी निघून गेला..
काही दिवसातच तो परदेशी गेला..
आणि सायाने त्याला हव्या असलेल्या दर्दचा पिच्छा पुरवायला सुरवात केली..दिवस रात्र रियाज करु लागली..
अशातच तिचा आवाज खराब होऊ लागला..
आणि एके दिवशी पूर्ण बंद झाला…
अम्मीने वेळोवेळी सांगितलं होतं अतिरेक वाईट..पण हिने ऐकलं नाही..
डॉक्टर, हकीम, बाबा होतील ते उपचार सुरू झाले..
साया फक्त तानपुरा घेऊन अम्मीच्या मागे बसू लागली..
उपचारांनी हळूहळू आवाज सुधारू लागला..आता बोलता येऊ लागलं..
आता मात्र तिने अम्मी सांगेल ते ऐकायचं ठरवलं..
नीट तालीम घेऊ लागली..
रियाझची खबर चाचाकडून कळायची..
त्याचंही शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागला होता..
सायाचं ऐकून त्यालाही मनोमन वाईट वाटलं आणि त्यानेही अल्लाकडे दुवा मागितली, की तिचा आवाज पूर्ववत होउदे..पण या पलीकडे काहीही करण्याला तो हतबल होता..
साया आता थोडं थोडं गाऊ लागली...फार उंच आणि फार खाली गाता येत नव्हतं तिला अजून..पण मध्य सप्तकात स्वर स्थिर करायचा प्रयत्न करायची..
अम्मीबरोबर सगळ्या मैफिलींना जायची..
या काळात तिला खरं गाण्याचं आयुष्यातलं महत्व कळलं होतं..
पण ती खचली नाही..स्वतःची चूक सुधारायला झटत राहिली..
आणि हळूहळू तिच्या प्रयत्नांना चांगलंच यश मिळालं..
तिला आता बरंच पहिल्यासारखं गाता येऊ लागलं..
पण ती सध्या बाहेर कुठे गात नव्हती…
आणखी काही दिवस गेले..ह्या सगळ्यात रियाझच्या आठवणींमधून तिला आणखी स्फुरण चढत होतं..कारण तिला गाण्यात तो दर्द हवा होता…
आणि अम्मीची ५०वि सालगिराह जवळ आली..
अम्मीने एक कार्यक्रम करुन सायाला पुन्हा लोकांसमोर आणायचं ठरवलं..या सगळ्यात तिचीही खूप फरफट झाली होती..
पण त्यामुळे तिच्या हाती तिचा हिरा अगदी तावून सुलाखून पडला होता..आणि त्या हिऱ्यालाच आता जगापुढे आणायचं होतं..

दिवस जवळ येत होता..तालीम जोरात सुरू होती..
साथीला चाचा स्वतः असायचे..
रियाझ त्याच दिवशी सकाळी यायचा होता, पण हे अम्मीने आणि चाचाने सायापासून लपवून ठेवलं होतं..कारण त्या दोघांमध्ये झालेलं सगळं रियाझने हल्लीच निकाहचा विषय निघाल्यावर चाचांना सांगितलं होतं..त्यामुळे अम्मी आणि चाचा दोघेही खुश होते..
बघता बघता दिवस उजाडला..
लोकं येत होती..अम्मीला दुवा देत होती..सायालाही भेटत होती..
आणि आता सायाचं गाणं सुरू व्हायची वेळ झाली..
साया गायला बसली..
डोळे मिटले..आणि त्या दिवशीचे चाचांचे शब्द तिला आठवले..
तिने गाणं सुरू केलं..
दाद मिळत होती पण त्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं..
तल्लीन होऊन गात होती..
आणि शेवटी तिने सरळ याद पिया की गायला घेतलं…
आज मात्र अम्मी नाराज नव्हती..
सायाने डोळे मिटून सुरवात केली..

बैरी कोयलिया कूक  सुनावे…
मुझ बिरहन का जियरा जलावे..
हाँ पी बिन रहा ना जाये.. हाये राम
याद पिया की आए…

जोबन बीता जाये- हाये राम..
याद पिया की आए…

गाणं संपलं..

सायाच्या बंद डोळ्यांमागे अश्रूंनी आडोसा धरला होता..
आणि बंद डोळ्यांमागे एक चित्रपट सुरू झाला होता..
अब्बूचं जाणं..तिची पहिली मैफिल..रियाझने दिलेला नकार..गमावून पुन्हा मिळवलेला आवाज…आणि सहज प्रश्न पडला..आवाज गमावून मिळाला..पण रियाझ..?
टाळ्यांच्या कडकडाटाने तिची तंद्री भंगली..
पुन्हा तेच सुभान अल्लाह, बोहोत खूप, जिती रहो, लाजवाबचे घुमणारे आवाज..
भरून पावलेले चेहरे..आणि पाणावलेल्या नजरेने तिच्याकडे पाहणारी अम्मी..आणि अम्मीला सावरुन धरलेला….
रियाझ….

आज सायाच्या यादला रियाझची साद मिळाली ती कायमचीच!

समाप्त

- कांचन लेले

3 comments: