Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Sunday 8 January 2017

Demonetization

#Demonetization

आज पहिल्यांदाच सध्याच्या ज्वलंत विषयावर बोलत आहे!

सरळ बघायला गेलं तर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेलं एक पाऊल..
खळबळ माजवणारं आणि तितकंच सुखावणारं सुद्धा..ज्यांना कळलं त्यांना सुखावेल, नाही कळलं त्यांना न कळून किंवा न आवडून काहीही पर्याय नाही..(टीका करणं, बोटं मोडणं, शिव्या घालणं, अफवा पसरवणं हे निरुपयोगी पर्याय असतात) …त्यामुळे आहे ते स्वीकारावंच लागेल..

सध्या काही राजकारण्यांची अशी टीका आहे की सामान्य लोकांचे हाल होतायत..काही प्रमाणात खरं असेलही..
पण सामान्य माणूस त्याला हाल मानतो आहे का..? कि आपल्या देशासाठी, आपल्या व पुढच्या पिढ्यांच्या उज्वल भविष्याकडे बघून आनंदाने सहकार्य करतोय हे मात्र राजकारण्यांनी नक्की पडताळून बघावं..
स्वानुभव - रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला सहज विचारलं की ATM कुठे आहे?  तर, कुठे कुठलं ATM आहे, कुठल्या ATM मध्ये फक्त कॅश डिपॉझिट होते आहे आणि कुठे पैसे मिळत आहेत असं सगळं अगदी तोंड वाकडं न करता लोकं सांगतात..
ATM च्या लायनीत आपल्या आजू-बाजूचा माणूस 'फक्त २००० ची नोट आहे' असं स्वतःहून सांगतो..मग काही लोक ज्यांना १००-५०० अपेक्षित असतात ते लाईन मध्ये वेळ घालवत नाहीत, सांगणाऱ्या माणसाचे आभार मानतात..
आणखी एक म्हणजे लाईन मध्ये उभे राहिलेले लोक मस्त एकमेकांशी गप्पा मारत, खेळीमेळीच्या वातावरणात उभे असतात..
काही अपवाद नक्कीच असतील, हा माझा वैयक्तिक अनुभव होता..
दुकानदार थोडी उधारी घेऊन-ठेऊन काम चालवत आहेत..
माणसा-माणसातला विश्वास वाढतो आहे..
एकूणच वातावरण सौजन्यपूर्ण आहे..!

आणखी एक पैलू म्हणजे, धर्म, जाती हे भेदभाव लोक सपशेल विसरले आहेत..लोकं हसून एकमेकांना मदत करत आहेत ज्यांना मदत करणं शक्य नाही ते दिलासा देत आहेत, समजावत आहेत..
काही ठिकाणि ठरलेली लग्न किंवा मंगल कार्य पार पाडायला पूर्ण गाव एक होऊन मदत करत आहे अशी बातमी वाचली..श्रीमंतांकडे पैसा असून उपयोग नाही आणि गरीबाकडे मोजकाच असल्याने फार त्रास नाही..
आज देशातला प्रत्येक नागरिक समान दर्जाकडे जात आहे..हि नक्कीच उल्लेखनीय कामगिरी आहे..

आणि आता त्रासाबद्दल म्हणायचं तर त्रास झाला नसता तर ही एकी दिसलीच नसती..तो आपला गुणधर्मच आहे बहुतेक!

Cashless transactions वाढत आहेत..त्याचं महत्व पटत आहे..काही वर्षात भारत बऱ्याच प्रमाणात cashless नक्कीच होईल अशी आशा वाटत आहे..!

५० दिवसांची मदत आपण नक्कीच करु शकतो..घरच्या कार्यासाठी जसे खस्ता सहन करतो तसंच हे घरचं कार्य समजून एकत्र पुढे पाऊल टाकूया.. कुठला पक्ष, कुठला नेता हे सगळं विसरुन आपलं हित कशात आहे हे बघून पाठिंबा देऊया..घेतलेल्या शिक्षणाचा वापर स्वतःसाठी व इतरांसाठीही करुया..!
एक पाऊल प्रगतीकडे टाकूया…! :)

©कांचन लेले

No comments:

Post a Comment